लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
Posted by
परेश बा. म्हात्रे
, Tuesday, September 29, 2009 at 4:35 AM, in
Labels:
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,
स्वातंत्र्यसैनिक
लोकमान्य टिळक म्हंटले कि, पहिले आठवते ते त्यांचे वाक्य. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळवणारच."
टिळकांचा जन्म रत्नागिरी मधील "मधल्या आळीत" एका मध्यमवर्गीय "मराठी चित्पावन ब्राम्हण" कुटुंबात झाला. पुण्यातील डेक्कन कॉलेज मध्ये १८७७ साली त्यांचा पदवी अभ्यासक्रम पुर्ण झाला. शिक्षण पुर्ण झाल्यावर त्यांनी पुण्यातील एका खाजगी शाळेत गणित शिकवायल सुरुवात केली. व नंतर त्यानी वृत्त्पत्रकरित चालु केली.
लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा हि दोन वृत्तपत्रे चालु केली. त्यात त्यांना गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळुणकर आणि इतर सहकार्यांची मदत मिळाली.
वृत्तपत्रात सरकारविरोधी जहाल लिखाणामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्य विरुद्ध गुन्ह दाखल केला व मंडाले (बर्मा) तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा दिली.
लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी "सार्वजनिक गणेशोत्सव" व "सार्वजनिक शिवजयंती" हे उत्सव सुरु केले.
टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. ते जातीने चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण होते[१] [२]. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढ्यांपासून रत्नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते[३]. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत. [४]
त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका ऍंग्लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली.[५] पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वतः अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले. मृत्युपूर्वी गंगाधरपंतानी त्यांचा विवाह दहा वर्षाच्या तापीबाई बरोबर करून दिला. [६]
टिळकांनी आगरकर, चिपणूनकर आणि इतर सहकार्यांच्या मदतीने १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. केसरीचा मुख्य उद्देश अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणार्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा होता. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परिक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यावरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये तात्काळ प्रसिद्ध झाले. १८८२ त्या शेवटापर्यंत केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment