दि ग्रेट मराठा
this site the web

झाशीची राणी लक्ष्मीबाई


इ. स. 1857 मध्ये भारतातील काही असंतुष्ट संस्थानिक आणि इंग्रज सेनेतील असंतुष्ट सैनिकांनी कंपनी सरकारविरूद्ध बंडाचं निशाण फडकावलं. "शिपायांचं बंड' म्हणून ते ओळखलं जातं. त्या युद्धात झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने मोठा पराक्रम गाजवला आणि अखेरीस ती शूर स्त्री धारातिर्थी पडली. इंग्रजांनी तिचं संस्थान खालसा केलं, त्यावेळी ती बाणेदारपणे उद्‌गारली होती - ""मेरी झॉंसी नहीं दूँगी!''
1857च्या या बंडला पहिलं स्वातंत्र्ययुद्ध असंही म्हटलं जातं आणि त्यामुळे त्यात भाग घेणारे सर्वजण स्वातंत्र्ययोद्धे ठरले आहेत. खरं तर त्या बंडाकडे पाहण्याची ही दृष्टीच सदोष आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचा त्या कालखंडातला व्यवहार पाहता हेच स्पष्ट होईल, की ही बाई शूर होती. पराक्रमी होती. पण आजच्य अर्थाने ती राष्ट्रभक्त नव्हती. तिला फक्त तिची सत्ता आणि तिचं संस्थान हवं होतं.
पहिल्या बाजीराव पेशव्याने छत्रसालास जी मदत केली, त्याबद्दल छत्रसालाकडून बाजीरावास बुंदेलखंड मिळाला. त्यातील त्यावेळी नेवाळकर घराण्याला मिळालेली जहागिरी म्हणजे झाशी. 1835 मध्ये या घराण्याचा अधिपती रामचंद्रराव याला, संस्थानाने दरवेळी इंग्रजांना जी मदत केली तिचा मोबदला म्हणून "महाराजाधिराज फिदवी बादशहा - जमाइंग्लिश्‍तान' ही पदवी मिळाली व झाशी एक संस्थान बनले.
लक्ष्मीबाईचा पती गंगाधरराव हा इंग्रजांच्या मेहेरबानीने संस्थानाधिपती झाला होता. 1843 साली त्याला राजेपदाचे हक्क मिळाले. लक्ष्मीबाई ही त्याची दुसरी पत्नी. विवाहसमयी तिचं वय 11-12 वर्षांचं होतं आणि मृत्युसमयी (1858) तिचं वय फार तर 23-24 वर्षांचं होतं.
गंगाधरराव 1853 साली वारला. त्यानंतर लक्ष्मीबाईने आपला दत्तक पूत्र दामोदर याला झाशीचा वारसा मिळावा यासाठी कसून प्रयत्न केला. या प्रसंगीचा तिचा मुख्य मुद्दा वंशपरंपरेने आपलं संस्थान इंग्रजांशी किती एकनिष्ठ राहिलं, आपापसात किती प्रेमाचे संबंध राहात आले, यावर बोट ठेवणं हा होता. परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि 1854 साली इंग्रजांनी तिला 60 हजाराचा तनखा मंजूर करून संस्थान खालसा केलं. त्यावेळी तिने ते तिचे ते "मेरी झॉंसी नहीं दूँगी!' हे प्रसिद्ध उद्‌गार काढले असं सांगण्यात येत असलं, तरी त्यावेळी मात्र तिने मुकाट्याने किल्ला खाली करून गावात राहणं पत्करलं. पुढं 57 सालापर्यंत गडबड न करता, अर्ज-विनंत्या-तक्रारी या चक्रात ती फिरत होती. प्रथम तिने पेन्शन नाकारलं. नंतर नाईलाजाने स्वीकारलं.
6 जून 1857 रोजी झाशीचा उठाव झाला आणि लक्ष्मीबाईने झाशीचा कारभार ताब्यात घेतला. पण नंतर तिने या घटनेसंबंधी इंग्रजांना स्पष्टिकरण दिलं आणि मग कमिशनरच्या हुकुमान्वये ती इंग्रजांच्या वतीने झाशीची कारभारीण बनली. फेब्रुवारी 1858 पर्यंत तिने इंग्रजांच्यासंबंधीचं मित्रत्त्वाचं धोरण बदललं नव्हतं असं मानण्यास जागा आहे. मार्चमध्ये इंग्रजी फौजांनी झाशीकडे कूच केलं. त्यावेळीही लक्ष्मीबाईने आपलं म्हणणं इंग्रजांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी ज्यावेळी तिच्यासमोर निश्‍चित स्वरुपात अशी वस्तुस्थिती उभी राहिली की झाशी संस्थान परत मिळणार नाही. इंग्रजांचा आपल्यावर विश्‍वास नाही. त्यांना शरण जाऊन मानहानीकारक जिणं जगावं किंवा फासावर चढावं हा एक मार्ग; किंवा लढून विजय प्रस्थापित करावा अगर हौतात्म्य पत्करावं हा दुसरा मार्ग, त्यावेळी तिने दुसरा मार्ग स्वीकारला आणि इथून पुढं तिने अतिशय शौर्याने लढा दिला.

2 comments:

Jyoti Navale said...

its shocking for me to read all this...

Unknown said...
This comment has been removed by the author.

Post a Comment

 

W3C Validations

Cum sociis natoque penatibus et magnis dis parturient montes, nascetur ridiculus mus. Morbi dapibus dolor sit amet metus suscipit iaculis. Quisque at nulla eu elit adipiscing tempor.

Usage Policies